बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

तत्वांचे महत्व

तत्व सत्वाची कसोटी,
भाग जीवनाचा असे.
सचोटीशी फारकत,
मग आयुष्यच फसे.

कधी गुंतागुंत वाढे,
कधी आयुष्यच गुंता.
तत्व असे ज्याचा प्राण,
त्यास का वाटे ही चिंता.

सांगोपांग विचारांची,
हवी मनाला सोबत.
मग कमावत जाई,
अनुभवाची दौलत.

राव असो वा तो रंक,
गुंता सारखाच आहे.
तत्वनिष्ठ राहणारा,
त्रिकाळात नित्य राहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दोन घासांची लाचारी

दोन घासांची लाचारी, अशी विवंचना ठाई. कणा नाममात्र जसा, प्रश्न भुकेचाच राही. येथे लाथाडले जाती, आत्मसन्मानाचे ढीग. अहंकाराचा प्रकोप, येई रोजच...