शनिवार, १४ मार्च, २०२०

आत्मभान

प्रवाही असावे जिणे,
एकच प्रवाह नको.
भान जगाचेही ठेवा,
आभासी जगणे नको.

आत्मकेंद्री जगल्यास,
शून्यच हाती लागती.
स्वार्थापोटी राखलेले,
बाण भात्यात गंजती.

भोवतालाचा अंदाज,
सूज्ञपणा वाढवतो.
माणसातून माणूस,
माणसापरि घडतो.

जया कळले गमक,
तोचि सदा सुखी होई.
झापडे लावून जगे,
त्याचा गाढवच होई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दोन घासांची लाचारी

दोन घासांची लाचारी, अशी विवंचना ठाई. कणा नाममात्र जसा, प्रश्न भुकेचाच राही. येथे लाथाडले जाती, आत्मसन्मानाचे ढीग. अहंकाराचा प्रकोप, येई रोजच...