शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

काव्यालाप

अडखळतो मी कधी कधी,
सुचत नाही कविता.
सुन्न होई डोके जेव्हा,
अति विचार करता.

आठवे माझा मी मग,
ती गर्दी विचारांची.
काव्यपंक्तीचा महापूर,
कोणती निवडायची.

आज वाटे मज बैचेन,
का रुसली माझी कविता.
चुटपुट लागे मनाला,
भावना कल्लोळ होता.

आळवता सूर विरहाचा,
मिटली मग माझी चिंता.
मम विरहगीतातूनच,
अवतरली माझी कविता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दोन घासांची लाचारी

दोन घासांची लाचारी, अशी विवंचना ठाई. कणा नाममात्र जसा, प्रश्न भुकेचाच राही. येथे लाथाडले जाती, आत्मसन्मानाचे ढीग. अहंकाराचा प्रकोप, येई रोजच...